Wednesday, 20 December 2017

साई कृपा न्यारी

जैसा भाव रहा जिस जन का, वैसा रूप हुआ मेरे मन का
साईबाबा..

साईबाबा एक शक्ती एक भक्ती एक दृष्टी आहे. याच भक्तितुन सौ वृषाली सानप काळे यांनी साईबाबा यांच्या व्यक्तीमत्वावर आधारित ब्रम्हसत्य हा हिंदी अनुवादित ग्रंथ लिहीला. मराठी भाषेचा प्रभाव असल्याने वृषालीताईंना हिंदीतील काही अवघड शब्दांचा अर्थ कळत नव्हता, पण साक्षात स्वप्नात येऊन साईबाबांनी आज्ञा केली होती, आणी मग काय जे अवघड ते सोपे झाले.. रात्रंदिवस जागरण करून ब्रम्हसत्य हा ग्रंथ साकार झाला.  त्याला पुजाताई बागुल यांनी साथ दिली. या दरम्यान साईबाबांचे अनेक चमत्कार वृषालीताईंनी अनुभवले कारण त्या काळात अखंड चिंतन साईंबाबांचे सुरू होते. ब्रम्हसत्य या अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन करण्याचे भाग्य मला लाभले, अर्थात हा योग जुळून आला कुसुमाग्रज साहित्यिक मंच नाशिक संजय गोराडे सर व विलास पंचभाई यांच्यामुळे, धन्य आम्ही जन्मा आलो दास साईबाबांचे झालो..
*साईकृपा न्यारी पड गयी सायन्सपर भी भारी*
मला सुद्धा असाच साईंबाबांचा चमत्कार अनुभवायला मिळाला गणेशोत्सवाचे दिवस,आमच्या लांडगे लिंबाची तालीम मंडळाचे डेकोरेशनचे काम सुरू होते. पेटींगसाठी काँम्प्रेसर आणायचा होता. स्टेज समोरच विश्वनाथ  आण्णांची जीप गाडी उभी होती. ती गाडी घेऊन काँम्प्रेसर आणायला जायचे होते. गाडीच्या अवती भवती खुप लहान मुल खेळत होती. मी सर्व मुलांना बाजुला केले आणी गाडीत बसलो. गाडी स्टार्ट केली. पहिला गियर टाकला आणी हळू हळू क्लच सोडला गाडीच्या चाकाला थोडीशी उटी लागल्या सारखे जाणवले, दगड असेल म्हणून मी जास्त लक्ष दिले नाही. समोरच्या लिंबाच्या ओट्यावर माझा मित्र लालासाहेब गाडे बसले होते. ते ओरडत होते पण माझे लक्ष त्यांच्याकडे नव्हते, गाडी हळू हळू पुढे जात होती. तो मित्र पळत गाडीजवळ आला आणी त्याने सांगितले गाडी खाली एक लहान मुलगा आहे. त्याच्या डोक्यावरून चाक गेले आहे. मला दरदरून घाम फुटला गाडीतून खाली उतरलो तर गाडी खाली एक लहान मुलगा निचपित पडला होता. तो पर्यंत गडबडी मुळे संपुर्ण गल्ली जमा झाली होती. त्या  मुलाची आई पण बाहेर आली एकुलत्या एक मुलाला गाडी खाली पाहुन तिने दारातुनच हंबरडा फोडला त्या आईचे ओरडणे सर्वांचे काळीज धडधडायला लावीत होते. त्या मुलाला ती आई जवळ घेऊन रस्त्यावरच गडबड लोळत होती. भयानक दृष्य होते ते.काय करावे सुचेना, तो पर्यंत ही बातमी समजल्यावर राजाराम तात्या तिथे आले थोडा धीर आला.  गावातील एका हाॅस्पीटल मध्ये त्या मुलाला घेऊन गेलो, डाॅक्टरांनी मुलाला तपासले, त्यांनी सांगितले या मुलाच्या डोक्यातील अवयव संपुर्ण बंद पडले आहेत, काहीच सुरू नाही. संपला आहे तो, माझे पाय थरथरू लागले हातापायाचा गळाटा झाला होता. पुढे होणाऱ्या घटनांचा विचार मनात थैमान घालीत होता. पोलीस स्टेशन डोळ्यासमोर दिसत होते या विचाराने ढेकर सुरू झाले होते. बीपी वरखाली होत होता. राजाराम तात्यांनी शेवटचा इलाज म्हणून मुलाला रूबी हाॅल पुणे या दवाखान्यात घेऊन जाऊ असा निर्णय घेतला.. आम्ही सर्वजण गाडीत बसलो, काय करावे, कोण वाचवेल, कोणाचा धावा करू, अचानक साईबाबांचे नाव आठवले आणी भोसरी ते पुणे साई नामाचा चा जप सुरू ठेवला..रूबी हाॅस्पीटल आले त्या मुलाला हाॅस्पीटल मध्ये घेऊन गेले, मी बाहेर थांबलो मुखात नाम जप सुरू होता. डोळे अश्रूंनी भरले होते. आयुष्यातील सर्वात मोठा गुन्हा घडला होता. पंचवीस ते तीस  मिनिटांनी दवाखान्यातुन सर्वजण बाहेर आले, सर्वांचे जरा वेगळेच वाटत होते त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव दुर झाल्याचे दिसत होते.  सर्वांच्या पाठी मागे त्या मुलाची आई होती. पण मुलगा कडेवर होता तो फक्त डोक्याला पट्टी बांधली होती. त्या मुलाला त्याची आई चक्क कडेवर घेऊन आलेली पाहिली, ती रडत होती पण आनंदाश्रु होते ते, मला विश्वास बसत नव्हता हा चमत्कार कसा घडला.. मला बाहेर आल्यावर सुनिलदादाने सांगितले? डाॅक्टरांनी  मुलाला चेक केले पण फक्त खरचटले आहे असे सांगितले, बाकी सर्व व्यवस्थित आहे. थोडा वेळ सर्वजण शाॅक झाले एक डाॅक्टर म्हणाला हा मुलगा संपला आहे. आणी दुसरे डाॅक्टर सांगतात किरकोळ जखम आहे. सर्वांनाच मोठा धक्का होता..पण मला जाणवले होते हा चमत्कार फक्त साईबाबांचा होता.  तसे माझ्यावर गणपती, संत ज्ञानेश्वर महाराज, साईबांबाची कृपा दृष्टी आहे पण ती माझ्यासाठी नाही समाजाच्या भल्यासाठी आहे. कधीही शिर्डीला दर्शनासाठी गेलो तरी व्ही आय पी दर्शन होते. ती सुद्धा कृपा अर्थात साईबांबाची याला निमित्त मात्र विनोदभाऊ चौधरी, बाळाभाऊ महाडिक, संतोषभाऊ खुळे हे..
अशीच कृपा साईबाबांची वृषालीताई सानप काळे यांच्यावर सुद्धा झाली. कविता लिहीता लिहीता त्यांनी बाबांचा ब्रम्हसत्य हा अनुवादित ग्रंथ लिहिला हा सुद्धा एक चमत्कारच आहे..
कृपादृष्टी असेल तर कुठूनही योग जुळून येतात,अनेक जण या कार्यात मदत करण्यासाठी आपोआप सहभागी होतात.. वृषालीताईंना खुप मोठी मदत पुजाताई बागुल यांनी केली कारण पुजाताई सुद्धा आध्यात्मिक मार्गावर आपले जीवन आनंदाने लोकांच्या सुख दु:खात सामील होऊन उपभोगत आहेत...साईंची लीला अफाट आहे..म्हणून आज शिर्डी जगात सुप्रसिद्ध आहे...

लेखन :- संदीप राक्षे
           भोसरी पुणे २६

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...