Tuesday, 19 December 2017

विनोदभाऊ एक दिलदार मित्र!

"विनोदभाऊ एक दिलदार मित्र "

*वि*- विश्वातील अंकुर मी,
*नो*- नोटांपरी मौल्यवान असे,
*द*- दडपणविरहीत जीवन माझे,
     जगात उमटवितो हास्याचे ठसे।

सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणजे विनोदभाऊ चौधरी. प्रसिद्ध कांदा व्यापारी विश्वासाचे एक नाव विनोदभाऊ चौधरी हे प्रत्येक राज्यात सुप्रसिद्ध आहेत. माझे भाग्य असे की अशा थोर मित्राची भेटही योगायोगानेच झाली, आणी कधी एकमेकांचे सख्खे बनुन गेलो आणी प्रेम जिव्हाळा जपत गेलो. जीवनाच्या सुख दु:खाच्या क्षणात आवर्जुन मायेची थाप टाकून मदत करणे हा त्यांचा स्वभाव, याचा प्रत्येकालाच अनुभव येतो.. धुळे आणी भोसरी कितीतरी दुर अंतर पण प्रत्येक दुखाच्या क्षणी भाऊंची उपस्थिती आल्हाददायक सुख देवुन जाते..कसलेही काम असले तरी भाऊ कधीच मागे हटत नाही. एकदा निर्णय घेतला की तो कोणत्याच परिस्थितीत माघारी घ्यायचा नाही. अशा स्वभावामुळे मैत्रीची एक फौजच तयार झाली आहे..
कर्तृत्वाने व मनाने मोठे असुनही कधीच मनात मोठेपणाचा आव नाही. समाजात वावरताना त्यांची एक वेगळीच छाप असते,शांत स्वभाव,करारी बाणा आणी स्पष्ट बोलणे या मुळेच भाऊ सर्वांचेच आदराचे स्थान आहेत, सहज माणुस आपलासा करण्याची कसब सहसा कोणालाच जमत नाही, पण भाऊ सहज माणसांची चैन जोडतात. प्रत्येकाच्या दुखात सामील होऊन दिलासा देण्याचे अतिउत्तम कार्य भाऊ करतात. देवावर अतिप्रमाणात श्रद्धा त्यामुळेच कुठेही अडीअडचणींवर सहज मात करतात. कलाकारांची उत्तम जाण त्यांना मदत करणे हे त्यांचे कार्य वाखाणण्या जोगे आहे..मालेगावचे एक रांगोळी आर्टिस्ट यांचे स्वप्न होते मला एकदातरी सिनेअभिनेते अशोक सराफ यांना भेटायचे आहे. त्यांचे ते स्वप्न विनोदभाऊंनी शिर्डी येथील कार्यक्रमात पुर्ण केले.. मी भरपूर वेळा धुळेला अनेक कलाकार घेऊन गेलो विनोदभाऊंनी दरवेळेस या कलाकारांचा मान सन्मान केला, त्यांना प्रसिद्धी मिळवुन देण्याचे महान कार्य सतत सुरू असते..प्रत्येक माणसाचा आधार विनोदभाऊ बनतात त्यांच्यासाठी काहीही करण्याची त्यांची मनाची तयारी असते. कधीही प्रसिद्धीच्या मागे न लागता सतत आपल्या कार्यात मग्न असतात.कुटुंब, व्यवसाय,आणी कार्य सांभाळून प्रत्येकाचे मन जपण्याचे त्यांचे कसब अप्रतिमच..एक दिवस आठवतो भाऊ बरोबर तिरूपती बालाजीला गेलो होतो.दर्शन घेऊन  परतीच्या प्रवासाला निघालो होतो. बेंगलोर पासुन पन्नास किलोमीटरवर वाटेत त्यांच्या मर्सिडीज बेंझ गाडीत डिझेल भरायला थांबलो होतो.पण आमच्या हातुन गाडीची चावी मागच्या डिक्कीत राहिली व गाडी अॅटोमॅटिक लाॅक झाली.भाऊ बिसलरी आणण्यासाठी शाॅप मध्ये गेले होते.त्यांना झालेला प्रकार सांगितला थोडे टेन्शन आले,पण लगेच सावरले हसत हसत आमच्या कडे पाहु लागले. बघुयात काहीतरी मार्ग काढुयात विचार करू नका,इतकी महागाची गाडी इतक्या आडरानात लाॅक झाली आमचे सर्व कपडे पैसे आत मध्येच राहिले. पुढे काय करायचे या विचारानेच माझे हातपाय थरथर कापु लागले. कारण त्या घटनेला आम्ही जबाबदार होतो.भाऊंनी दोन शब्द सांगितले शांत रहा. मर्सिडीज बेंज च्या शोरूमला फोन लावला पण काही उपयोग झाला नाही.एका ठिकाणी फोन लावला ते म्हणाले गाडीची मागची छोटीशी काच तोडावी लागेल तिचा खर्च ऐंशी हजार रूपये सांगितला तो ऐकून मी खुपच टेन्शन ला आलो. जर काच फोडलीतर पावसाळ्याचे दिवस इतकी महागडी गाडी खराब होईल तसे करायचे आम्ही टाळले, भाऊंची स्वताची गाडी इतका खर्च आणि होणारा मनस्ताप पण त्यांच्या चेहर्यावर हसु होते. मी पण त्यांच्या या गुणाकडे पहात होतो. चावी पाहिजे त्याशिवाय गाडी उघडणार नाही.. भाऊंनी निर्णय घेतला आपण दुसरी चावी धुळेहुन आणायची,बेंगलोरहुन विमानाने मुंबई ला जायचे गाडीची दुसरी चावी धुळेहुन मुंबईला मागावुन घ्यायची असे ठरले त्यांनी पटापट सगळी कडे फोन लावले..आमच्या पासुन मागे पन्नास किलोमीटर बेंगलोर होते.
भाऊंनी कसलाच विचार न करता एअरपोर्ट गाठले. नाशिकचे मित्र अमितजी गिरीशजी अजिंक्यजी यांच्यावर मुंबई एअरपोर्ट ला चावी आणण्याची जबाबदारी सोपवली.. आम्ही गाडीच्या जवळच थांबुन राहिलो..रात्र होत होती तशी वर्दळ कमी होऊ लागली आता गाडी जवळ आम्ही तिघेच होतो. रात्र काढायची होती. पण त्यापेक्षा विनोदभाऊंना झालेला त्रास खुप मोठा होता.ते मध्यरात्री बेंगलोर हुन मुंबईला पोहचले तो पर्यंत अमितजी गिरीशजी अजिंक्यजी मुंबई एअरपोर्ट ला दुसरी गाडीची चावी घेऊन हजर होते.पहाटे पर्यंत त्या सर्वांनी रात्र एअरपोर्ट ला काढली सकाळच्या पहिल्या विमानाने विनोदभाऊ बेंगलोर ला आले,आणी आमच्या पर्यंत दुस-या दिवशी दहा वाजता चावी घेऊन आले..झोप नसल्यामुळे आमचे चेहरे पहाण्यासारखे झाले होते पण भाऊंचा चेहरा आनंदी होता... इतका त्रास सहन करूनही आनंदी अशासाठी होते ते फक्त आम्हाला अजून दु:ख नको वाटायला,इतके नुकसान होऊन त्रास होऊन सुद्धा मैत्रीसाठी झालेला राग तिथेच दाबुन टाकला,काहीच झाले नाही या आनंदात पुन्हा प्रवास सुरू केला हा गुण किती मोठा. खरच दिलदार मित्राची ही अनुभूती वारंवार अनुभवास येते.मी तर पहिल्यापासूनच निस्सीम प्रेम करायचो पण या घटनेनंतर अजुन त्यांचा फॅन झालो. मी खरच स्वताला भाग्यवंत समजतो असा माझा मित्र असाच प्रत्येक जन्मात सोबत असुदे हेच साकडे माऊलींना कायम घालतो.
विनोदभाऊंच्या खुप सा-या शुभेच्छा देतो, त्यांचे भावी आयुष्य सुख समृद्धी आणी भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो ...

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...