भावनिकतेने भारतीयांची बौद्धिकता संपत चालली आहे का?
मुळात भारत हा भावनाप्रधान देश आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला विचारधारा दिली. अभ्यासातून भावनेला दूर करण्याचे शस्त्र दिले पुरोगामी विचार रूजविले परंतु अलिकडच्या धर्मांध राजकारण्यांच्या कडून धर्म यावर आधारित गोष्टींचा अफूच्या गोळीप्रमाणे वापर केला जात आहे.
त्यात आज सोशल मीडियात भाजपाचे आय टी सेल पॉवरफुल आहे, इथे सतत राजकिय चर्चा किंवा धर्माचे उदात्त असे चित्रीकरण करून धर्माधर्मात तेढ वाढवण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, या सोशल मीडियाचा वापर प्रत्येक राजकिय पक्ष पण आपल्या सोयीनुसार करत असतो, जर सगळ्यांना आठवत असेल तर २०१४ ची झालेली लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी या सोशल मीडियाचा खूप खुबीने वापर करण्यात आला होता, प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते, जर एखादी गोष्ट तीच तीच पण वेगवेगळ्या पद्धतीने जर त्याच्यासमोर आणली गेली तर त्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लागणारी सारासार विवेकबुद्धी माणूस गमावून बसतो व जी गोष्ट आपल्यासमोर आहे तीच खरी यावर माणसाचा ठाम विश्वास बसतो, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू व काँग्रेस विषयीचे इतके विष पेरण्यात आले आणि हीच नेमकी गोष्ट हेरून सोशल मीडिया हा आज निवडणुकीचा महत्वपुर्ण हिस्सा झाला आहे. भावनिक ही जनता तेवढेच सत्य मानून जीवनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करून हेच अंतिम सत्य आहे हे मानून चालते अन ही खूप मोठी गंभीर चिंतनाची बाब आहे,
जाहिरातबाजीने आपल्या जीवनावर कसा परिणाम केला आहे याबद्दल एक उदाहरण सांगतो.
एक ७५ वर्षाच्या आजीबाई आपल्या नातवाला म्हणतात मला ते पतंजली शिकेकाई शाम्पू आणून दे जर दुसरे shampoo वापरले तर मला त्रास होतो, मग नातू म्हणाला पण आजी तू तर नेहमीच शिकेकाई वापरायचीस ना मग आता शाम्पू कशाला, त्यावर आजीबाईचे स्मार्ट उत्तर होते, अरे त्यामुळे केस छान मऊ होतात आणि शिकेकाईचे पण त्यात काही तत्व आहेतच ना या वरच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की सोशल मीडिया मुळे आपल्या रोजच्या गोष्टीवर पण किती परिणाम झाला आहे, भारतीय घटनेचा तिसरा खांब पत्रकारिता आज पॅकेज घेऊन असत्याला सत्य दाखविण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. मीडियावर होणाऱ्या कित्येक चर्चा ह्या उथळ व दिखाऊ असतात, काही अंशी सत्य जरी असले तरी त्यात व्यासंगाचा अभाव दिसतो, त्यात आजकालच्या तरुणांचे वाचन अतिशय मर्यादित झाले आहे, फक्त FB किंवा आणि जाहीरातबाजीवर त्यांचे ज्ञान सीमित असते त्यामुळे हे तरुण चुकीच्या बाजूने जाण्याचा खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.
एक तर सीमित वाचन, अभ्यासाचा अभाव, तत्कालीन किंवा सद्य परिस्थितीचे खूप कमी आकलन असते, त्यामुळे उथळ राजकीय चर्चा व मोठमोठ्या भुलवून टाकणाऱ्या शब्दात लिहलेले लेख त्यांना खरे वाटते, त्यामुळे धर्मभावना, देशभक्ती, देशद्रोह, आरक्षण, जात या अफूच्या गोळीचा वापर सोशल मिडियाद्वारे भारतीय जनता पक्ष खुबीने वापर करून जनतेला भुलवण्याचे काम करते व भोळी जनता याच दिखाव्याला फसत जाते.
आज देशात मंदी, नोट बंदीतील भ्रष्टाचार, GST मुळे बंद पडलेले उदयोग व्यवसाय, महागाई, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात वाढले आहे पण हे भाजपाचे सरकार यावर तोडगा काढण्याऐवजी पाकिस्तान, पुलवामा, 370 कलम, अयोध्या मंदिर अशी भावनिक कारणे पुन्हा पुन्हा पुढे करून आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे ही सत्य परिस्थिती आहे.
आजचे राजकारण कमालीचे बदलले आहे, सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर हेच क्षेत्र जास्त करते, बदलत्या राजकारण समजून घेताना या माध्यमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, या माध्यमाचा प्रत्यक्ष जनजीवनातील सहभाग, त्याचे स्थान व महत्त्व आपल्याला अधोरेखित आहेच, काळाने निर्माण केलेल्या आजच्या समाजाचा हे माध्यम आरसा आहे आणि हीच नेमकी गोष्ट भाजपाने हेरली व तिचा खुबीने वापर करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहे, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारला की ते भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करतात, खरतर यांनी पण मोदी साहेबांच्या सारखी जनतेच्या भावनिकतेची नस ओळखली आहे. गेले पाच वर्षात महाराष्ट्र अधोगतीला गेलेला आहे पण यांच्या भल्या मोठ्या जाहिरातींच्या मधून विकासाचे दर्शन होत आहे. अनेक मोर्चे निघत आहेत, प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे परंतु त्याला देशभक्तीची गोळी दररोज सुरू आहे. दुर्देवाची गोष्ट ही आहे की सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करण्याऐवजी फक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीच वापर करण्यात येतो, आपण नेहमीच बघतो निवडणुका जश्या जाहीर होतात तसे देशावर हल्ला होणार, ईडीची कारवाई होणार अशा बातम्यांचा टीव्ही वर चर्चाना उत येतो, काही चॅनल्सवर विद्यमान सरकारचा उदो, त्यांच्या कामाचा गौरव सतत चालु असतो यातून समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक गोष्टींची विशिष्ट मांडणी करून त्याच त्याच गोष्टींचा सतत भडिमार केला जातो त्यामुळे एका प्रश्नाला दोन बाजू असतात किंबहुना मेंदू बधिर झाल्यासारखे आपण त्या बाबतीत अधिकाधिक कट्टर होत जातो त्यामुळे आजच्या समाजाने विशेषतः तरुणांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा, आणि नाण्याच्या दोन बाजू असतात यावर चिंतन करावे फक्त बोलबच्चन, भावनिकतेच्या व जाहिरातबाजीच्या विळख्यात न अडकता नेहमी सत्य काय आहे ते शोधून काढावे व जनतेला एक सक्षम व स्वच्छ असा राजकारणात पर्याय द्यावा हीच सदिच्छा...
मीडियाच्या जाहिरातबाजीने
जनता जनार्दन फसली
वाजता रणशिंग निवडणुकीचे
बघा आता पेटून उठली
संदीप राक्षे ✍🏻
(सरचिटणीस)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र...
मुळात भारत हा भावनाप्रधान देश आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला विचारधारा दिली. अभ्यासातून भावनेला दूर करण्याचे शस्त्र दिले पुरोगामी विचार रूजविले परंतु अलिकडच्या धर्मांध राजकारण्यांच्या कडून धर्म यावर आधारित गोष्टींचा अफूच्या गोळीप्रमाणे वापर केला जात आहे.
त्यात आज सोशल मीडियात भाजपाचे आय टी सेल पॉवरफुल आहे, इथे सतत राजकिय चर्चा किंवा धर्माचे उदात्त असे चित्रीकरण करून धर्माधर्मात तेढ वाढवण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, या सोशल मीडियाचा वापर प्रत्येक राजकिय पक्ष पण आपल्या सोयीनुसार करत असतो, जर सगळ्यांना आठवत असेल तर २०१४ ची झालेली लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी या सोशल मीडियाचा खूप खुबीने वापर करण्यात आला होता, प्रत्येक माणसाची एक मानसिकता असते, जर एखादी गोष्ट तीच तीच पण वेगवेगळ्या पद्धतीने जर त्याच्यासमोर आणली गेली तर त्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी लागणारी सारासार विवेकबुद्धी माणूस गमावून बसतो व जी गोष्ट आपल्यासमोर आहे तीच खरी यावर माणसाचा ठाम विश्वास बसतो, महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू व काँग्रेस विषयीचे इतके विष पेरण्यात आले आणि हीच नेमकी गोष्ट हेरून सोशल मीडिया हा आज निवडणुकीचा महत्वपुर्ण हिस्सा झाला आहे. भावनिक ही जनता तेवढेच सत्य मानून जीवनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करून हेच अंतिम सत्य आहे हे मानून चालते अन ही खूप मोठी गंभीर चिंतनाची बाब आहे,
जाहिरातबाजीने आपल्या जीवनावर कसा परिणाम केला आहे याबद्दल एक उदाहरण सांगतो.
एक ७५ वर्षाच्या आजीबाई आपल्या नातवाला म्हणतात मला ते पतंजली शिकेकाई शाम्पू आणून दे जर दुसरे shampoo वापरले तर मला त्रास होतो, मग नातू म्हणाला पण आजी तू तर नेहमीच शिकेकाई वापरायचीस ना मग आता शाम्पू कशाला, त्यावर आजीबाईचे स्मार्ट उत्तर होते, अरे त्यामुळे केस छान मऊ होतात आणि शिकेकाईचे पण त्यात काही तत्व आहेतच ना या वरच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की सोशल मीडिया मुळे आपल्या रोजच्या गोष्टीवर पण किती परिणाम झाला आहे, भारतीय घटनेचा तिसरा खांब पत्रकारिता आज पॅकेज घेऊन असत्याला सत्य दाखविण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. मीडियावर होणाऱ्या कित्येक चर्चा ह्या उथळ व दिखाऊ असतात, काही अंशी सत्य जरी असले तरी त्यात व्यासंगाचा अभाव दिसतो, त्यात आजकालच्या तरुणांचे वाचन अतिशय मर्यादित झाले आहे, फक्त FB किंवा आणि जाहीरातबाजीवर त्यांचे ज्ञान सीमित असते त्यामुळे हे तरुण चुकीच्या बाजूने जाण्याचा खूप मोठा धोका निर्माण झाला आहे.
एक तर सीमित वाचन, अभ्यासाचा अभाव, तत्कालीन किंवा सद्य परिस्थितीचे खूप कमी आकलन असते, त्यामुळे उथळ राजकीय चर्चा व मोठमोठ्या भुलवून टाकणाऱ्या शब्दात लिहलेले लेख त्यांना खरे वाटते, त्यामुळे धर्मभावना, देशभक्ती, देशद्रोह, आरक्षण, जात या अफूच्या गोळीचा वापर सोशल मिडियाद्वारे भारतीय जनता पक्ष खुबीने वापर करून जनतेला भुलवण्याचे काम करते व भोळी जनता याच दिखाव्याला फसत जाते.
आज देशात मंदी, नोट बंदीतील भ्रष्टाचार, GST मुळे बंद पडलेले उदयोग व्यवसाय, महागाई, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात वाढले आहे पण हे भाजपाचे सरकार यावर तोडगा काढण्याऐवजी पाकिस्तान, पुलवामा, 370 कलम, अयोध्या मंदिर अशी भावनिक कारणे पुन्हा पुन्हा पुढे करून आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे ही सत्य परिस्थिती आहे.
आजचे राजकारण कमालीचे बदलले आहे, सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर हेच क्षेत्र जास्त करते, बदलत्या राजकारण समजून घेताना या माध्यमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, या माध्यमाचा प्रत्यक्ष जनजीवनातील सहभाग, त्याचे स्थान व महत्त्व आपल्याला अधोरेखित आहेच, काळाने निर्माण केलेल्या आजच्या समाजाचा हे माध्यम आरसा आहे आणि हीच नेमकी गोष्ट भाजपाने हेरली व तिचा खुबीने वापर करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहे, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारला की ते भारत माता की जय, वंदे मातरम चा जयघोष करतात, खरतर यांनी पण मोदी साहेबांच्या सारखी जनतेच्या भावनिकतेची नस ओळखली आहे. गेले पाच वर्षात महाराष्ट्र अधोगतीला गेलेला आहे पण यांच्या भल्या मोठ्या जाहिरातींच्या मधून विकासाचे दर्शन होत आहे. अनेक मोर्चे निघत आहेत, प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे परंतु त्याला देशभक्तीची गोळी दररोज सुरू आहे. दुर्देवाची गोष्ट ही आहे की सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करण्याऐवजी फक्त एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीच वापर करण्यात येतो, आपण नेहमीच बघतो निवडणुका जश्या जाहीर होतात तसे देशावर हल्ला होणार, ईडीची कारवाई होणार अशा बातम्यांचा टीव्ही वर चर्चाना उत येतो, काही चॅनल्सवर विद्यमान सरकारचा उदो, त्यांच्या कामाचा गौरव सतत चालु असतो यातून समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक गोष्टींची विशिष्ट मांडणी करून त्याच त्याच गोष्टींचा सतत भडिमार केला जातो त्यामुळे एका प्रश्नाला दोन बाजू असतात किंबहुना मेंदू बधिर झाल्यासारखे आपण त्या बाबतीत अधिकाधिक कट्टर होत जातो त्यामुळे आजच्या समाजाने विशेषतः तरुणांनी या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा, आणि नाण्याच्या दोन बाजू असतात यावर चिंतन करावे फक्त बोलबच्चन, भावनिकतेच्या व जाहिरातबाजीच्या विळख्यात न अडकता नेहमी सत्य काय आहे ते शोधून काढावे व जनतेला एक सक्षम व स्वच्छ असा राजकारणात पर्याय द्यावा हीच सदिच्छा...
मीडियाच्या जाहिरातबाजीने
जनता जनार्दन फसली
वाजता रणशिंग निवडणुकीचे
बघा आता पेटून उठली
संदीप राक्षे ✍🏻
(सरचिटणीस)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र...