नवचैतन्य!
दिवसा मागुन दिवस
अलगद जाती सरत,
घर करुन राहती,
आठवांचे ठसे मनात!
एक क्षण आपला अन्,
दुसराच मात्र परका.
हिशोब असा आयुष्याचा,
कधी कुणा लागतो का,?
जुन्याच रोपट्यांच्या कळ्या
अत्तर नवे देवू लागतात,
क्षितिजावर रंग कोवळे
हळूच ठेवून जातात..!
हळवे रंग मंद गंध
डाव अंबरात मांडती,
रंगीतसा इंद्रधनुही एक,
ठसा आपला तिथे सोडती!
सूर नवे लयही नवी
गीत नवेच उमटले,
अर्थ खुळे भाव ओले
शब्दातून धगधगले!
होऊन वाऱ्याने सैरभैर
लाटा हळूवार रेंगाळल्या,
सागरावरती त्याच पुन्हा,
नव्या उमेदीने फेसाळल्या!
हदय जुने,चैतन्य थेंब नवे
नसानसात सळसळले,
देह जुना जल्लोष नवा
पुन्हा तारुण्य जणू उमलले !
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी,पुणे २६
८६५७४२१४२१
वाह सर.. आपल्या सर्वच कविता सुरेख आहेत. सर्व वाचल्या...
ReplyDelete