इतिहासाच्या अस्पष्ट पाऊलखुणा (१)
शहाजी राजे यांनी स्वराज्याची स्वप्न ज्या किल्यावरून पाहिली तो पेमगिरी किल्ला उर्फ भीमगड उर्फ शाहगड.
इतिहासाच्या पुन्हा
खुणावतात पाऊलखुणा!
अस्पष्ट झाल्या तरी
स्पष्ट जाणवतात मना!
डाॅ अमोल कोल्हे सरांनी अस्पष्ट असलेला इतिहास आज स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संपूर्ण भारतदेशाला स्पष्ट करून दाखविला आहे. आज आपण पवित्र अशा शिवशंभूच्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो हेच भाग्य थोर, म्हणूनच पुन्हा इतिहासाकडे एक एक पाऊल ओढत आहे.
सुट्टी असल्यावर मन काही स्वस्थ बसू देत नाही. आता मनालाही सवय लागली त्याच्या गुणधर्माप्रमाणे भटकायची, मनसोक्त हुंदडायची, निसर्गात रमायची, गड दगड मातीशी मैत्री करण्याची, त्यांच्या कडून इतिहास ऐकण्याची.
आयुष्यात निर्व्यसनी राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यात यशस्वी झालो पण भटकंतीच्या या व्यसनाने पछाडलेच. चार पाच दिवस अगोदरच पेमगिरीची आठवण झाली होती या वेळी नक्कीच जायचे ठरविले
नाशिकला एक महत्त्वाचे लग्न होते पण ते रात्री उशीरा सात वाजता होते. मी तर सकाळी नऊ वाजताच घरातून बाहेर पडलो होतो. आज सोबतीला कोणीच नव्हते, पेमगिरी सारखी डोळ्यासमोर दिसायची, मनात विचार यायचा आपण तर एकटेच चाललो आहोत उगीच कशाला जोखीम घ्यायची. गाडी चालवत असतानाच दोन मनांचे भयंकर व्दंद सुरू झाले होते. कोणीच माघार घेत नव्हते. गाडीचे टायर सुद्धा उगाळलेले होते त्यातील तारा सुद्धा दिसत होत्या. नको जायला असे सांगणारे मन नवनवीन संकट पुढे करीत होतं. पण काही झाले तरी जायचेच, कितीही संकट आली तरी तू स्वता खंबीर आहेस या सर्व परस्थितीला नक्कीच सामोरा जाशील हे सांगणा-या मनाचे मी ऐकले आणि निश्चय केला.
नाशिक पुणे हायवे लगतच दौलत हाॅटेल आहे तिथे नास्ता करायला थांबलो. मोबाईलच्या मॅप या अॅपसवर पेमगिरी सर्च केले पन्नास किलोमीटरचे अंतर दाखविले तेथूनच आमचे मित्र थोरात सर व अनिल गडाख यांना या स्थळाची रितसर माहिती मिळवली.
संगमनेरच्या अलिकडे खांडगावहून डावीकडे वळण घेतले. हायवे पासून पेमगिरी बावीस किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्ता थोडा खराब असल्याने मनात धाकधुकी होती. आजूबाजूचा हिरवा परिसर पाहून, प्रवरा नदीचा प्रवाह पाहून मन आनंदी होत होते.
जस जसे अंतर कापत होतो तशा सह्याद्रीच्या डोंगररांगा स्पष्ट दिसत होत्या, पुसट, गडद दिसणा-या सह्याद्रीचा रांगा पाहिल्या की निधड्या छातीच्या मावळ्यांचा इतिहास आठवतो. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला मावळी गडी दिसतो. उन, पाऊस, वादळ, वारा युगे न युगे अंगावर झेलून सुद्धा त्याच तडफेने उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा या महाराष्ट्राचे खरे वैभवच दिसते.
एकट्याने चालताना सोसती जे यातना
चालत्या त्या पावलांसाठीच माझी प्रार्थना!
बंधने तोडून ज्यांनी मार्ग हा चोखाळला
हा यशाचा सूर्य त्यांच्या कल्पनेला भाळला!
वाकले अस्मान आहे या क्षितीजाच्या पुढे
चालतो जो जो पुढे हा मार्ग त्याला सापडे!
संत कोणी होत नाही यातनांना टाळुनी
लोभ त्यांनी टाकले ध्येयापुढे ओवाळुनी!
कष्टदायी वाट आहे पर्वतांना घाट आहे
या किनारे शोधणारी सोबतीला लाट आहे!
कवी गजानन मुळे यांच्या या कवितेच्या ओळी आठवतच पेमगिरीला पोहचलो होतो. खरतर मी आलो होतो येथील विराट असा महावटवृक्ष पहायला पण जवळच पेमगिरी गड आहे कळले आणि पहिला मोर्चा गडाकडे वळविला. कारण पुढचा पायी प्रवास एकट्याचा होता आणि पेमगिरी गड चढायचा होता. या कवितांच्या ओळींनी मनाला काहीसे बळ दिले होते. गडाच्या पायथ्याला पेमगिरी हे गाव वसलेले शंभर दोनशे घरांचा उंबरा असलेले गाव, तेथे एका टपरी वाल्याला गडाकडे जाण्याचा मार्ग विचारला, गाडीत मला एकट्याला पाहून तो जरा माझ्याकडे विचित्र नजरेनेच पहात होता. नक्कीच त्याच्या मनात एकच विचार आला असणार "खरच हा खूप वेडा माणूस दिसतो आहे" हे मी जाणले मी पण थोडा हसलो. त्याने हातानेच इशारा करून मला सांगितले या रोडने सरळ गडावर गाडी जाते. मी थोड्या अंतरावर गेलो अन मनात विचार आला आपण जर गडावर गाडी घेऊन गेलो आणि टायर ने दगा दिला तर ? गाडी तिथेच एका झाडाखाली लावली अन पायी गडावर जायचे ठरविले.
नास्ता चहा पाणी झाल्याने शरीर उत्साही होते. अवघड चढण पार करता करता दम लागत होता. ऊन असूनही कडक पणा न जाणवता वातावरणातील थंडीचा प्रवाह अधिक जाणवत होता. गुलाबी हवा शरिराला गारवा प्रदान करीत होती. गाडी रोडने चढाई केल्याने थकवा जाणवला नाही. पण अंतर खुप वाढले होते. अखेर गडावर पोहोचलो, मंदिरात जाऊन ज्या देवीच्या नावावरून पेमगिरी नाव पडले त्या पेमादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. गडावर काहीच नव्हते. तटबंदीच्या खुणा तेवढ्या दिसत होत्या. काही ठिकाणी पाण्याचे टाके दिसत होते. पेमगिरी च्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नव्हते, गडावर चिटपाखरूही दिसत नव्हते शक्य तितका गडावरचा परिसर पाहिला आणि गडाच्या दुस-या बाजूने उतरायला सुरुवात केली. तहानेने घशाला कोरड पडली होती. खाली उतरताना दूरूनच पायथ्याशी लाकडी वाड्याची प्रतिकृती दिसत होती. काहितरी ऐतिहासिक असणार म्हणून मी त्या वाड्याकडे गेलो तर ते मारूतीरायाचे मंदीर होते. पण ते बाहेरून एखाद्या सरदाराच्या वाड्यासारखे दिसत होते. बाहेरून कुलूप असल्याने आत मधे जाता आले नाही. तिथेच एका झाडाखाली बसलो होतो. माझ्या शेजारीच साधारण साठीच्या घरात असणारे गृहस्थ बसले होते. त्यांनी मला विचारले कोठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून. एकटेच का? मी हो म्हणालो, जरा गावचा आणि गडाचा इतिहास विचारावा म्हणून त्या दादांना बोलते केले. पहिल्यांदा त्यांनी मला वरवर उत्तर दिली. पण नंतर ते इतिहास सांगू लागले.
हा पेमगिरीचा किल्ला हा भीमगड व शाहगड या नावाने इतिहासात ओळखला जातो. इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला होता. मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडविली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन याच पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले."शहाजीराज्यांनी याच किल्यावर सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले व तसा तीन वर्षे कारभारही केला. हे वाक्य ऐकले आणि आपण ज्या गडावरून जाऊन आलो तिथे स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले याचा माझा मलाच अभिमान वाटला. अनभिज्ञ असलेल्या इतिहासाची माहिती पायथ्याशी आल्यावर मिळत आहे याचे सर्वात मोठे दु:ख झाले. दादा पुढील इतिहास सांगत होते. १७३८ ते १७४० या दरम्यान पहिला बाजीराव पेशवे व मस्तानी यांचे वास्तव्य सुद्धा याच शाहगडावर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १६४२ साली बांधलेली बारव म्हणजे विहीर जवळच आहे ती पण पहा, थोडक्यात हा इतिहास ऐकून या गडावर पुन्हा चढून जावं अस वाटत होते. इतक्या घडामोडी या गडावर घडल्या हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. या गडाचा इतिहास सांगितल्यावर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष येथूनच दिड किलोमीटरवर आहे असे सांगितले पण जाण्यापूर्वी त्या वडाच्या विषयी थोडी माहिती सांगाल का अशी विनंती केली.
जिथे हा महाकाय वटवृक्ष आहे त्या भागाला मोरदरा असे म्हणतात. कित्येक शतके हा वड वादळ- वा-याला नैसर्गिक आपत्तींना तोंड देत तो तेथे खंबीरपणे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरावर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. हा वटवृक्ष पहाण्यासाठी परदेशातून पण अनेक पर्यटक येतात. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. आता कथा ऐकत बसलो तर पुढे नाशिकला जाणे होणार नाही, म्हणून दादांचे आभार मानले. निरोप घेतला, आज खरच त्यांच्या मुळे खूप मोठी माहिती मला मिळाली होती. जाता जाता सहज मी त्यांना त्यांचे नाव विचारले? ते म्हणाले मी बबन कानवडे येथून जवळच माझे गाव आहे, मी रिटायर्ड शिक्षक आहे. तरी मी पण विचार करीत होतो. यांना इतका इतिहास कसा माहीती. पुन्हा एकदा त्यांचा निरोप घेतला आणि जवळ असणा-या मोरद-याचे दिशेने निघालो.
उभा महाकाय वटवृक्ष
देतसे इतिहासाची साक्ष!
पाहून त्याचे विराट रूप
भासे मायेचा तो कक्ष!
महाकाय वटवृक्षाला पाहून सहजच माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले.
या वडाला पाहूनच माझी नजर फिरू लागली. नीरव शांतता, या झाडावरील पक्षांचा किलबिलाट जणू काही येथे जत्राच भरलेली. आजूबाजूला कोणीच नव्हते मी एकटाच त्या भल्या मोठ्या वडाच्या सानिध्यात उभा होतो. जिकडे पहावे तिकडे त्या वडाच्या पारंब्या त्याच पारब्यांचे झालेले झाड पाहून हा निसर्गाचा चमत्कारच वाटत होता. वडाला आयुर्वेदात मोठे स्थान आहे. वडाच्या झाडाच्या जवळ पास ऑक्सीजनचे प्रमाण खूप जास्त असते, त्याच मुळे ज्यावेळी मी दुरून हे झाड पाहिले, तेव्हा त्या वडाच्या झाडाच्या भोवतीने निळाईची झालर पसरलेली दिसत होती. एकटा असल्याने नको त्या विचारांनी मनात थैमान घातले होते. वडाच्या झाडाच्या बुंध्याजवळ आलो तिथे सिंदूर लावलेल्या काही मुर्ती दिसत होत्या. येथील लोकांचे श्रद्धास्थान म्हणून मी पण दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
शहाजी राजे यांनी स्वराज्याची स्वप्न ज्या किल्यावरून पाहिली तो पेमगिरी किल्ला उर्फ भीमगड उर्फ शाहगड.
इतिहासाच्या पुन्हा
खुणावतात पाऊलखुणा!
अस्पष्ट झाल्या तरी
स्पष्ट जाणवतात मना!
डाॅ अमोल कोल्हे सरांनी अस्पष्ट असलेला इतिहास आज स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संपूर्ण भारतदेशाला स्पष्ट करून दाखविला आहे. आज आपण पवित्र अशा शिवशंभूच्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो हेच भाग्य थोर, म्हणूनच पुन्हा इतिहासाकडे एक एक पाऊल ओढत आहे.
सुट्टी असल्यावर मन काही स्वस्थ बसू देत नाही. आता मनालाही सवय लागली त्याच्या गुणधर्माप्रमाणे भटकायची, मनसोक्त हुंदडायची, निसर्गात रमायची, गड दगड मातीशी मैत्री करण्याची, त्यांच्या कडून इतिहास ऐकण्याची.
आयुष्यात निर्व्यसनी राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यात यशस्वी झालो पण भटकंतीच्या या व्यसनाने पछाडलेच. चार पाच दिवस अगोदरच पेमगिरीची आठवण झाली होती या वेळी नक्कीच जायचे ठरविले
नाशिकला एक महत्त्वाचे लग्न होते पण ते रात्री उशीरा सात वाजता होते. मी तर सकाळी नऊ वाजताच घरातून बाहेर पडलो होतो. आज सोबतीला कोणीच नव्हते, पेमगिरी सारखी डोळ्यासमोर दिसायची, मनात विचार यायचा आपण तर एकटेच चाललो आहोत उगीच कशाला जोखीम घ्यायची. गाडी चालवत असतानाच दोन मनांचे भयंकर व्दंद सुरू झाले होते. कोणीच माघार घेत नव्हते. गाडीचे टायर सुद्धा उगाळलेले होते त्यातील तारा सुद्धा दिसत होत्या. नको जायला असे सांगणारे मन नवनवीन संकट पुढे करीत होतं. पण काही झाले तरी जायचेच, कितीही संकट आली तरी तू स्वता खंबीर आहेस या सर्व परस्थितीला नक्कीच सामोरा जाशील हे सांगणा-या मनाचे मी ऐकले आणि निश्चय केला.
नाशिक पुणे हायवे लगतच दौलत हाॅटेल आहे तिथे नास्ता करायला थांबलो. मोबाईलच्या मॅप या अॅपसवर पेमगिरी सर्च केले पन्नास किलोमीटरचे अंतर दाखविले तेथूनच आमचे मित्र थोरात सर व अनिल गडाख यांना या स्थळाची रितसर माहिती मिळवली.
संगमनेरच्या अलिकडे खांडगावहून डावीकडे वळण घेतले. हायवे पासून पेमगिरी बावीस किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्ता थोडा खराब असल्याने मनात धाकधुकी होती. आजूबाजूचा हिरवा परिसर पाहून, प्रवरा नदीचा प्रवाह पाहून मन आनंदी होत होते.
जस जसे अंतर कापत होतो तशा सह्याद्रीच्या डोंगररांगा स्पष्ट दिसत होत्या, पुसट, गडद दिसणा-या सह्याद्रीचा रांगा पाहिल्या की निधड्या छातीच्या मावळ्यांचा इतिहास आठवतो. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला मावळी गडी दिसतो. उन, पाऊस, वादळ, वारा युगे न युगे अंगावर झेलून सुद्धा त्याच तडफेने उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा या महाराष्ट्राचे खरे वैभवच दिसते.
एकट्याने चालताना सोसती जे यातना
चालत्या त्या पावलांसाठीच माझी प्रार्थना!
बंधने तोडून ज्यांनी मार्ग हा चोखाळला
हा यशाचा सूर्य त्यांच्या कल्पनेला भाळला!
वाकले अस्मान आहे या क्षितीजाच्या पुढे
चालतो जो जो पुढे हा मार्ग त्याला सापडे!
संत कोणी होत नाही यातनांना टाळुनी
लोभ त्यांनी टाकले ध्येयापुढे ओवाळुनी!
कष्टदायी वाट आहे पर्वतांना घाट आहे
या किनारे शोधणारी सोबतीला लाट आहे!
कवी गजानन मुळे यांच्या या कवितेच्या ओळी आठवतच पेमगिरीला पोहचलो होतो. खरतर मी आलो होतो येथील विराट असा महावटवृक्ष पहायला पण जवळच पेमगिरी गड आहे कळले आणि पहिला मोर्चा गडाकडे वळविला. कारण पुढचा पायी प्रवास एकट्याचा होता आणि पेमगिरी गड चढायचा होता. या कवितांच्या ओळींनी मनाला काहीसे बळ दिले होते. गडाच्या पायथ्याला पेमगिरी हे गाव वसलेले शंभर दोनशे घरांचा उंबरा असलेले गाव, तेथे एका टपरी वाल्याला गडाकडे जाण्याचा मार्ग विचारला, गाडीत मला एकट्याला पाहून तो जरा माझ्याकडे विचित्र नजरेनेच पहात होता. नक्कीच त्याच्या मनात एकच विचार आला असणार "खरच हा खूप वेडा माणूस दिसतो आहे" हे मी जाणले मी पण थोडा हसलो. त्याने हातानेच इशारा करून मला सांगितले या रोडने सरळ गडावर गाडी जाते. मी थोड्या अंतरावर गेलो अन मनात विचार आला आपण जर गडावर गाडी घेऊन गेलो आणि टायर ने दगा दिला तर ? गाडी तिथेच एका झाडाखाली लावली अन पायी गडावर जायचे ठरविले.
नास्ता चहा पाणी झाल्याने शरीर उत्साही होते. अवघड चढण पार करता करता दम लागत होता. ऊन असूनही कडक पणा न जाणवता वातावरणातील थंडीचा प्रवाह अधिक जाणवत होता. गुलाबी हवा शरिराला गारवा प्रदान करीत होती. गाडी रोडने चढाई केल्याने थकवा जाणवला नाही. पण अंतर खुप वाढले होते. अखेर गडावर पोहोचलो, मंदिरात जाऊन ज्या देवीच्या नावावरून पेमगिरी नाव पडले त्या पेमादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. गडावर काहीच नव्हते. तटबंदीच्या खुणा तेवढ्या दिसत होत्या. काही ठिकाणी पाण्याचे टाके दिसत होते. पेमगिरी च्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नव्हते, गडावर चिटपाखरूही दिसत नव्हते शक्य तितका गडावरचा परिसर पाहिला आणि गडाच्या दुस-या बाजूने उतरायला सुरुवात केली. तहानेने घशाला कोरड पडली होती. खाली उतरताना दूरूनच पायथ्याशी लाकडी वाड्याची प्रतिकृती दिसत होती. काहितरी ऐतिहासिक असणार म्हणून मी त्या वाड्याकडे गेलो तर ते मारूतीरायाचे मंदीर होते. पण ते बाहेरून एखाद्या सरदाराच्या वाड्यासारखे दिसत होते. बाहेरून कुलूप असल्याने आत मधे जाता आले नाही. तिथेच एका झाडाखाली बसलो होतो. माझ्या शेजारीच साधारण साठीच्या घरात असणारे गृहस्थ बसले होते. त्यांनी मला विचारले कोठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून. एकटेच का? मी हो म्हणालो, जरा गावचा आणि गडाचा इतिहास विचारावा म्हणून त्या दादांना बोलते केले. पहिल्यांदा त्यांनी मला वरवर उत्तर दिली. पण नंतर ते इतिहास सांगू लागले.
हा पेमगिरीचा किल्ला हा भीमगड व शाहगड या नावाने इतिहासात ओळखला जातो. इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला होता. मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडविली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन याच पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले."शहाजीराज्यांनी याच किल्यावर सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले व तसा तीन वर्षे कारभारही केला. हे वाक्य ऐकले आणि आपण ज्या गडावरून जाऊन आलो तिथे स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले याचा माझा मलाच अभिमान वाटला. अनभिज्ञ असलेल्या इतिहासाची माहिती पायथ्याशी आल्यावर मिळत आहे याचे सर्वात मोठे दु:ख झाले. दादा पुढील इतिहास सांगत होते. १७३८ ते १७४० या दरम्यान पहिला बाजीराव पेशवे व मस्तानी यांचे वास्तव्य सुद्धा याच शाहगडावर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १६४२ साली बांधलेली बारव म्हणजे विहीर जवळच आहे ती पण पहा, थोडक्यात हा इतिहास ऐकून या गडावर पुन्हा चढून जावं अस वाटत होते. इतक्या घडामोडी या गडावर घडल्या हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. या गडाचा इतिहास सांगितल्यावर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष येथूनच दिड किलोमीटरवर आहे असे सांगितले पण जाण्यापूर्वी त्या वडाच्या विषयी थोडी माहिती सांगाल का अशी विनंती केली.
जिथे हा महाकाय वटवृक्ष आहे त्या भागाला मोरदरा असे म्हणतात. कित्येक शतके हा वड वादळ- वा-याला नैसर्गिक आपत्तींना तोंड देत तो तेथे खंबीरपणे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरावर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. हा वटवृक्ष पहाण्यासाठी परदेशातून पण अनेक पर्यटक येतात. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. आता कथा ऐकत बसलो तर पुढे नाशिकला जाणे होणार नाही, म्हणून दादांचे आभार मानले. निरोप घेतला, आज खरच त्यांच्या मुळे खूप मोठी माहिती मला मिळाली होती. जाता जाता सहज मी त्यांना त्यांचे नाव विचारले? ते म्हणाले मी बबन कानवडे येथून जवळच माझे गाव आहे, मी रिटायर्ड शिक्षक आहे. तरी मी पण विचार करीत होतो. यांना इतका इतिहास कसा माहीती. पुन्हा एकदा त्यांचा निरोप घेतला आणि जवळ असणा-या मोरद-याचे दिशेने निघालो.
उभा महाकाय वटवृक्ष
देतसे इतिहासाची साक्ष!
पाहून त्याचे विराट रूप
भासे मायेचा तो कक्ष!
महाकाय वटवृक्षाला पाहून सहजच माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले.
या वडाला पाहूनच माझी नजर फिरू लागली. नीरव शांतता, या झाडावरील पक्षांचा किलबिलाट जणू काही येथे जत्राच भरलेली. आजूबाजूला कोणीच नव्हते मी एकटाच त्या भल्या मोठ्या वडाच्या सानिध्यात उभा होतो. जिकडे पहावे तिकडे त्या वडाच्या पारंब्या त्याच पारब्यांचे झालेले झाड पाहून हा निसर्गाचा चमत्कारच वाटत होता. वडाला आयुर्वेदात मोठे स्थान आहे. वडाच्या झाडाच्या जवळ पास ऑक्सीजनचे प्रमाण खूप जास्त असते, त्याच मुळे ज्यावेळी मी दुरून हे झाड पाहिले, तेव्हा त्या वडाच्या झाडाच्या भोवतीने निळाईची झालर पसरलेली दिसत होती. एकटा असल्याने नको त्या विचारांनी मनात थैमान घातले होते. वडाच्या झाडाच्या बुंध्याजवळ आलो तिथे सिंदूर लावलेल्या काही मुर्ती दिसत होत्या. येथील लोकांचे श्रद्धास्थान म्हणून मी पण दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो...
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१
No comments:
Post a Comment