चंद्रेश्वर, रेणूकामातेच्या कृपाछायेतील, चंद्रहास राजाचे चांदवड ....
खुप वर्षापासून पुणे नाशिक धुळे तसेच मुंबई आग्रा या महामार्गावर सतत प्रवास करण्याचा योग आला परंतु नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या परिसरातील सातमाळा डोंगर रांगेशिवाय काहीच पाहिले नाही. ही पण डोंगर रांग चालत्या गाडीतूनच डोळ्यात साठवायची अन पुढे प्रवास करायचा, जाताना येताना डोंगरावर मंदिर दिसायचे पण कधीच जाणून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही. बँकेला लागोपाठ तीन सुट्या मिळाल्या होत्या एक दिवस किरण सानप यांच्या शिंगवे गावी जायचे ठरवले अन दोन दिवस शरद पवार माझ्या शब्दात या स्पर्धे विषयी काम करायचे ठरवले..ठरविल्या प्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले पण तीन दिवस गेले ते कामातच गेले, असे वाटू लागले. धुळे चे काम उरकले अन मालेगावच्या पुढे आलो होतो. मनात विचार आला आज इथेच कुठे तरी नविन एखादे प्रेक्षणीय स्थळ, किंवा एखाद तीर्थक्षेत्र पाहूनच पुढे जावूयात त्यासाठी मनातल्या मनातच शोधाशोध सुरू झाली तो पर्यंत चांदवड घाटात येऊन पोहचलो, एका चहाच्या टपरीवर चहा घेतला अन त्याच टपरीवाल्याला विचारले? इथे पहाण्यासाठी कोणते धार्मिक किंवा प्रेक्षणीय स्थळ चांगले आहे का? त्याने दूरूनच बोट करून दाखवले इथून एक किलोमीटर अंतरावर गेलात की तीन ठिकाण आहेत. १} चंद्रेश्वर मंदिर, २) रेणूकामाता मंदिर, ३) इच्छापुर्ती गणपती मंदीर ...
एकटाच असल्याने निर्णय सुद्धा मनासारखे घेता येत होते. चांदवडच्या घाटात आलो, डाव्या बाजूलाच चंद्रेश्वर मंदिराचा रस्ता होता. त्यारस्ताने गाडी थेट मंदिरा पर्यंत जात होती. वेडी वाकडी वळणे घेत, गाडीला सुद्धा डोंगरावर चढताना त्रास होत होता. मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. भव्यदिव्य कमान प्रत्येकाचे स्वागत करीत होती. तेथून डोंगराच्या कडेला आलो, तेथून चांदवड गाव व तिथली घर खूपच लहान दिसत होती. चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या बाजुच्या पाय-याने चढून मंदिरात पोहचलो. गाभा-यात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन बसलो होतो.
तिथे एका खोलीत एक साधू महाराज बसलेले दिसले आता मलाही या मंदिरा बाबत जाणून घ्यायचे होते. थोडीशी तरी माहिती असावी म्हणून खोलीच्या दाराजवळ गेलो. नमो आदेश बाबाजी असे बोललो? बाबांजींनी काहीच न बोलता नजरेने इशारा केला की आत मधे या.
साधू संत भेटता
होई मनोमनी हर्ष
उलगडती कोडी
होई आध्यात्माचा स्पर्श...
आत गेलो बाबांजीचे दर्शन घेतले अन तिथेच बसलो. थोड्यावेळाने बाबांनी मराठीतूनच विचारले कुठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून आलो. काय कामानिमित्त आलो आहे ते पण सविस्तर सांगितले. आता उत्सुकता लागली होती मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची, पण बाबांजीकडे पाहिल्यावर धाडसच होईना काही विचारायचे. मनकवडे असल्या सारखे बाबांनीच मंदिराची आख्यायिका सांगण्यास सुरुवात केली.
चंद्रसेन राज्याचे साम्राज्य असणारी ही चांदवड नगरी याच चंद्रसेन राज्याने या चंद्रेश्वर मंदिराची निर्मिती केली होती. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता त्या शापाचे निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची पिंड स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्रदेव शाप मुक्त झाले. चंद्रामध्ये जी महान शीतलता आहे शांत प्रकाशमय शक्ती आहे त्यामुळेच या क्षेत्राला चंद्रेश्वर हे नाव पडले आहे. ही भूमी पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी होती. मोठ मोठया दिव्य ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले इथे तपश्चर्या केली. इ. स १६०० ते १७०० साली मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या सहाय्याने या भुमी उध्वस्त केली. येथे असलेल्या विविध देवतांची ५२ मंदिरे नष्ट करण्यात आली. या वेळी तपाला बसलेल्या सप्त ऋषींची हत्या करण्यात आली. त्यांच्या समाधी पण तुम्ही पाहून आलात मी हो म्हणालो. पुढे एक दिवस भ्रमंती करीत करीत स्वामी १०८ श्री दयानंद महाराज चांदवड या ठिकाणी आले, त्यांना या पवित्र भुमीचा दुष्टांत झाला त्यावेळी त्यांनी चंद्रेश्वरची पिंड शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली. जीर्ण असलेल्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. त्याच रात्री भगवान शंकराने श्री दयानंद स्वामींना साक्षात दुष्टांत दिला. महाराज श्री दयानंद स्वामींनी या पुरातन स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शंकराचे कट्टर उपासक व सिद्धयोगी असलेल्या स्वामीं दयानंद महाराजांनी काशीहून शिष्य विद्यानंदजीना बोलवुन सर्व घटना कथन केली. संस्कृतचे अध्ययन अर्धवट सोडून आलेल्या विद्यानंद महाराजांनी होकार दिला. गुरु व शिष्य दोघांनी अपार कष्ट घेऊन या भुमीला नावारूपाला आणले. स्वातंत्र पुर्व काळात प्राचीन चंद्रेश्वरावर परत कळस चढविला. प्रथम चंद्रेश्वर बाबा महाराज दयानंद स्वामींनी चंद्रेश्वराची सेवा केली. या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या व रमणीय परिसराने नटलेल्या या मनोहर देवालयाला पूर्वीचे वैभव दोघा स्वामींनी प्राप्त करून दिले. तसेच इथे प्रभु रामचंद्रांचे पण पवित्र पावन पाऊल या भुमीला लागले आहेत. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना या नगरीवरून चालले होते. प्रभू रामचंद्र ही एकदा या चंद्रेश्वर मंदिराच्या डोंगरावर वास्तव्यास होते, सीतामाईने इच्छा प्रकट केली की रोडगे करून त्याचा नैव्यद्य चंद्रेश्वराला द्यावा. तेव्हा डोंगरावर पाणी नव्हते म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी उत्पन्न केले . पुढे लोकांनी ते कुंड व्यवस्थित बांधून घेतले. तेच आज गणेश टाका म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेश टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यातील पाणी कधीच आटत नाही व पाणी अतिशय गोड, थंड व आरोग्यास लाभदायक आहे. चमत्कार म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून ४०० फुट उंचीवर असूनही तेथे डोंगरावर पाणी कोठून व कसे येते याचा मात्र शोध लागत नाही. बाबाजी सांगत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन सारं ऐकत होतो. क्षणभर मलाही समाधी लागल्या सारखे झाले. तितक्यात तिथे बाबांजींचे दोन शिष्य आले जेवणाची वेळ झाली आहे बाबाजी आपण चलावं. बाबाजी निघून गेले, मी पुन्हा जाऊन सर्व समाधींचे व चंद्रेश्वराचे दर्शन घेतले.
आजूबाजूचा परिसर पाहिला अन पुन्हा डोंगर उतरून तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर आलो तिथे रेणुका मातेचे पुरातन मंदिर दिसले. मंदिराच्या बाहेरच दोन दिपमाळ होत्या भव्य असा पुरातन दरवाजा व शेजारीच एक महाल होता तो महाल अहिल्यादेवी होळकर यांचा होता तो पाहून मंदिरात शिरलो एका कड्याच्या आतमधे हे मंदीर बांधलेले होते. दगडी कमानी व त्यावर सुबक नक्षीकाम इतिहासाची आठवण करून देत होती. मंदिराच्या दोन्ही बाजूने दर्शनाची सुविधा केलेली होती. कड्याच्या एका कपारीत रेणूकादेवीचे मुख असणारी सुंदर घडवलेली मुर्ती होती तिचे दर्शन घेतले अन दुस-या बाजूने बाहेर पडलो या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७४० मध्ये केला होता. ही रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे तसेच पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे.
तेथूनच हायवेच्या पलिकडे अर्धा किलोमीटरवर ३०० वर्षापूर्वीचे इच्छापुर्ती गणेशाचे मंदीर आहे. तिथे पोहचलो सुंदर एका टेकडीच्या कुशीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरात खुपच गर्दी होती. मंदिराच्या सभामंडपात उभा राहून थोडावेळ थांबलो, प्रत्येक भक्तगण आपल्या इच्छा गणेशाला सांगताना दिसत होते. मी मुख्य मंदिरात गेलो तर एक वेगळीच गणपतीची मुर्ती दृष्टीस पडली या अगोदर कधीच अशी मुर्ती मी पाहिली नव्हती. दर्शन घेतले प्रदक्षिणा घातली. अनेक भक्त तिथे नवस फेडायला आलेले पण दिसत होते. विघ्नहर्त्याचे हे वेगळं रूप पाहून मन आनंदी झाले. क्षणभर विसावा घेतला, अन पुढच्या प्रवासाला निघालो....
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
२३/२/२०२०
खुप वर्षापासून पुणे नाशिक धुळे तसेच मुंबई आग्रा या महामार्गावर सतत प्रवास करण्याचा योग आला परंतु नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या परिसरातील सातमाळा डोंगर रांगेशिवाय काहीच पाहिले नाही. ही पण डोंगर रांग चालत्या गाडीतूनच डोळ्यात साठवायची अन पुढे प्रवास करायचा, जाताना येताना डोंगरावर मंदिर दिसायचे पण कधीच जाणून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही. बँकेला लागोपाठ तीन सुट्या मिळाल्या होत्या एक दिवस किरण सानप यांच्या शिंगवे गावी जायचे ठरवले अन दोन दिवस शरद पवार माझ्या शब्दात या स्पर्धे विषयी काम करायचे ठरवले..ठरविल्या प्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले पण तीन दिवस गेले ते कामातच गेले, असे वाटू लागले. धुळे चे काम उरकले अन मालेगावच्या पुढे आलो होतो. मनात विचार आला आज इथेच कुठे तरी नविन एखादे प्रेक्षणीय स्थळ, किंवा एखाद तीर्थक्षेत्र पाहूनच पुढे जावूयात त्यासाठी मनातल्या मनातच शोधाशोध सुरू झाली तो पर्यंत चांदवड घाटात येऊन पोहचलो, एका चहाच्या टपरीवर चहा घेतला अन त्याच टपरीवाल्याला विचारले? इथे पहाण्यासाठी कोणते धार्मिक किंवा प्रेक्षणीय स्थळ चांगले आहे का? त्याने दूरूनच बोट करून दाखवले इथून एक किलोमीटर अंतरावर गेलात की तीन ठिकाण आहेत. १} चंद्रेश्वर मंदिर, २) रेणूकामाता मंदिर, ३) इच्छापुर्ती गणपती मंदीर ...
एकटाच असल्याने निर्णय सुद्धा मनासारखे घेता येत होते. चांदवडच्या घाटात आलो, डाव्या बाजूलाच चंद्रेश्वर मंदिराचा रस्ता होता. त्यारस्ताने गाडी थेट मंदिरा पर्यंत जात होती. वेडी वाकडी वळणे घेत, गाडीला सुद्धा डोंगरावर चढताना त्रास होत होता. मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. भव्यदिव्य कमान प्रत्येकाचे स्वागत करीत होती. तेथून डोंगराच्या कडेला आलो, तेथून चांदवड गाव व तिथली घर खूपच लहान दिसत होती. चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या बाजुच्या पाय-याने चढून मंदिरात पोहचलो. गाभा-यात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन बसलो होतो.
तिथे एका खोलीत एक साधू महाराज बसलेले दिसले आता मलाही या मंदिरा बाबत जाणून घ्यायचे होते. थोडीशी तरी माहिती असावी म्हणून खोलीच्या दाराजवळ गेलो. नमो आदेश बाबाजी असे बोललो? बाबांजींनी काहीच न बोलता नजरेने इशारा केला की आत मधे या.
साधू संत भेटता
होई मनोमनी हर्ष
उलगडती कोडी
होई आध्यात्माचा स्पर्श...
आत गेलो बाबांजीचे दर्शन घेतले अन तिथेच बसलो. थोड्यावेळाने बाबांनी मराठीतूनच विचारले कुठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून आलो. काय कामानिमित्त आलो आहे ते पण सविस्तर सांगितले. आता उत्सुकता लागली होती मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची, पण बाबांजीकडे पाहिल्यावर धाडसच होईना काही विचारायचे. मनकवडे असल्या सारखे बाबांनीच मंदिराची आख्यायिका सांगण्यास सुरुवात केली.
चंद्रसेन राज्याचे साम्राज्य असणारी ही चांदवड नगरी याच चंद्रसेन राज्याने या चंद्रेश्वर मंदिराची निर्मिती केली होती. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता त्या शापाचे निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची पिंड स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्रदेव शाप मुक्त झाले. चंद्रामध्ये जी महान शीतलता आहे शांत प्रकाशमय शक्ती आहे त्यामुळेच या क्षेत्राला चंद्रेश्वर हे नाव पडले आहे. ही भूमी पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी होती. मोठ मोठया दिव्य ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले इथे तपश्चर्या केली. इ. स १६०० ते १७०० साली मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या सहाय्याने या भुमी उध्वस्त केली. येथे असलेल्या विविध देवतांची ५२ मंदिरे नष्ट करण्यात आली. या वेळी तपाला बसलेल्या सप्त ऋषींची हत्या करण्यात आली. त्यांच्या समाधी पण तुम्ही पाहून आलात मी हो म्हणालो. पुढे एक दिवस भ्रमंती करीत करीत स्वामी १०८ श्री दयानंद महाराज चांदवड या ठिकाणी आले, त्यांना या पवित्र भुमीचा दुष्टांत झाला त्यावेळी त्यांनी चंद्रेश्वरची पिंड शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली. जीर्ण असलेल्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. त्याच रात्री भगवान शंकराने श्री दयानंद स्वामींना साक्षात दुष्टांत दिला. महाराज श्री दयानंद स्वामींनी या पुरातन स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शंकराचे कट्टर उपासक व सिद्धयोगी असलेल्या स्वामीं दयानंद महाराजांनी काशीहून शिष्य विद्यानंदजीना बोलवुन सर्व घटना कथन केली. संस्कृतचे अध्ययन अर्धवट सोडून आलेल्या विद्यानंद महाराजांनी होकार दिला. गुरु व शिष्य दोघांनी अपार कष्ट घेऊन या भुमीला नावारूपाला आणले. स्वातंत्र पुर्व काळात प्राचीन चंद्रेश्वरावर परत कळस चढविला. प्रथम चंद्रेश्वर बाबा महाराज दयानंद स्वामींनी चंद्रेश्वराची सेवा केली. या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या व रमणीय परिसराने नटलेल्या या मनोहर देवालयाला पूर्वीचे वैभव दोघा स्वामींनी प्राप्त करून दिले. तसेच इथे प्रभु रामचंद्रांचे पण पवित्र पावन पाऊल या भुमीला लागले आहेत. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना या नगरीवरून चालले होते. प्रभू रामचंद्र ही एकदा या चंद्रेश्वर मंदिराच्या डोंगरावर वास्तव्यास होते, सीतामाईने इच्छा प्रकट केली की रोडगे करून त्याचा नैव्यद्य चंद्रेश्वराला द्यावा. तेव्हा डोंगरावर पाणी नव्हते म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी उत्पन्न केले . पुढे लोकांनी ते कुंड व्यवस्थित बांधून घेतले. तेच आज गणेश टाका म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेश टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यातील पाणी कधीच आटत नाही व पाणी अतिशय गोड, थंड व आरोग्यास लाभदायक आहे. चमत्कार म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून ४०० फुट उंचीवर असूनही तेथे डोंगरावर पाणी कोठून व कसे येते याचा मात्र शोध लागत नाही. बाबाजी सांगत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन सारं ऐकत होतो. क्षणभर मलाही समाधी लागल्या सारखे झाले. तितक्यात तिथे बाबांजींचे दोन शिष्य आले जेवणाची वेळ झाली आहे बाबाजी आपण चलावं. बाबाजी निघून गेले, मी पुन्हा जाऊन सर्व समाधींचे व चंद्रेश्वराचे दर्शन घेतले.
आजूबाजूचा परिसर पाहिला अन पुन्हा डोंगर उतरून तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर आलो तिथे रेणुका मातेचे पुरातन मंदिर दिसले. मंदिराच्या बाहेरच दोन दिपमाळ होत्या भव्य असा पुरातन दरवाजा व शेजारीच एक महाल होता तो महाल अहिल्यादेवी होळकर यांचा होता तो पाहून मंदिरात शिरलो एका कड्याच्या आतमधे हे मंदीर बांधलेले होते. दगडी कमानी व त्यावर सुबक नक्षीकाम इतिहासाची आठवण करून देत होती. मंदिराच्या दोन्ही बाजूने दर्शनाची सुविधा केलेली होती. कड्याच्या एका कपारीत रेणूकादेवीचे मुख असणारी सुंदर घडवलेली मुर्ती होती तिचे दर्शन घेतले अन दुस-या बाजूने बाहेर पडलो या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७४० मध्ये केला होता. ही रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे तसेच पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे.
तेथूनच हायवेच्या पलिकडे अर्धा किलोमीटरवर ३०० वर्षापूर्वीचे इच्छापुर्ती गणेशाचे मंदीर आहे. तिथे पोहचलो सुंदर एका टेकडीच्या कुशीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरात खुपच गर्दी होती. मंदिराच्या सभामंडपात उभा राहून थोडावेळ थांबलो, प्रत्येक भक्तगण आपल्या इच्छा गणेशाला सांगताना दिसत होते. मी मुख्य मंदिरात गेलो तर एक वेगळीच गणपतीची मुर्ती दृष्टीस पडली या अगोदर कधीच अशी मुर्ती मी पाहिली नव्हती. दर्शन घेतले प्रदक्षिणा घातली. अनेक भक्त तिथे नवस फेडायला आलेले पण दिसत होते. विघ्नहर्त्याचे हे वेगळं रूप पाहून मन आनंदी झाले. क्षणभर विसावा घेतला, अन पुढच्या प्रवासाला निघालो....
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
२३/२/२०२०